दादासाहेब फाळके पुरस्कार आणि महंमद रफी
नुकताच आपल्या फिल्म इंडस्ट्री मधील सर्वोच्च असा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा एक थोर व गुणी अभिनेत्री वहीदा रेहमान यांना देण्यात आल्यामुळे देशभरातील चित्रपट प्रेमींच्या मनात आनंदाच्या भावना उमटल्या यात शंकाच नाही! प्रत्येक कलाकाराला हा पुरस्कार आपल्या जीवनात मिळवण्याची इच्छा असतेच! हा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दरवर्षी माहीती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येतो. ह्या पुरस्काराचा बहुमान अश्या व्यक्तीला देण्यात येतो, ज्याने भारतीय सिनेमाचा विकास, आणि प्रगती यामध्ये बहुमूल्य योगदान केले आहे. आणि अश्या कलाकाराची निवड ही देशातील नामवंत अश्या चित्रपट व्यवसायातील व्यक्तीकडून होत असते. हा पुरस्कार दहा लाख रुपये रोख, स्वर्ण कमळ व शाल अश्या स्वरूपात असतो. दादासाहेब फाळके यांनी भारतात प्रथम चित्रपटाची मुहूर्त मेढ रोवली. पहीला संपूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चन्द्र त्यांनी दिग्दर्शीत केला त्यानंतरही ते या क्षेत्रांत कार्यरत राहीले व चित्रपट सृष्टीला एक भरीव योगदान त्यांनी दिले. अश्या या महान माणसाच्या नावाने देशातील हा चित्रपटातील सर्वोच्च बहुमान त्यांच्या नांवाने देण्याचे