पंचाहत्तरीतला प्रवेश
अखेर ' म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान ' म्हणत पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्यावेळच्या बेळगांव जिल्ह्यातील (आताच्या कोल्हापूर ) कारवे या छोट्याश्या गावांत जन्माला आलेला मी अनेक टप्पे टोणपे खात सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या ओढीने मुंबईला पोचलो, आणि शेवटी येथेच स्थायीक झालो. माझे ध्येय तसे मी बालपणापासूनच ठरवले होते. सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टला जायचे आणि तेथूनच कला शिक्षण घ्यायचे हे माझे नक्की ठरले होते. आणि ते ध्येय अखेर साध्य झाले. एवढेच नव्हे तर माझ्या सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेशी संबंध जुळले तेही कायमचे. न तुटणारे. अनेक नाती जुळली. अनेक शिक्षक दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले. या संस्थेनें मला नांव दिले, एक चेहरा दिला, स्वतंत्र ओळख दिली. येथे शिकलो, तसेच पुढे शिकवू पण लागलो. खरं तर मीच माझ्या विद्यार्थ्यांकडून शिकू लागलो. कारण त्यांच्या समस्यांवर उपाय शोधताना बऱ्याच गोष्टी स्वतःला अभ्यासाव्या लागत. त्यांच्याच कल्पना पुढे नेताना माझ्याही मनांत कल्पनेचे अंकूर फुटू लागत. त्यांच्याशी चर्चा ह्या विचार प्रसारणाची देवाण घेवाण बनू लागली. व खऱ्या अर्थाने तेथेच