अमृत चित्रांचा देशी वाण :अमृता शेरगील
ब्रिटिशांच्या राजवटीमुळे भारतीयांच्या सामाजीक तसेंच आर्थीक, पारंपारीक आणि कला जीवनावर खूप मोठा परीणाम झाला होता. यामुळे आपल्या सभोवतालच्या वातावरणलाही फार मोठा धक्का पोचला होता. आणि विशेष करून येथील कला जीवनावर देखील काही कमी आघात झाले नव्हते. देशांतील पारंपारिक कला शिक्षण देणारे दिवस मागे मागे पडत चालले होते. त्या काळात जी कला विद्यालये स्थापन झाली होती, त्यामध्ये बहुदा निव्वळ पाठशालेय शिक्षण दिले जात होते. ज्या दोन महान अश्या कला संस्था तेव्हां स्थापन झाल्या त्यापैकी एक होती बंगाल स्कुल, ज्यांनी प्राचीन भारतीय चित्रशैलीचे व विशेषकरून त्यातील प्रणय, शृंगार चित्राविष्कार करण्यावर भर दिला. व दुसरे होते बॉंबे स्कुल, जेथे पाच्छात अकॅडमिक चित्रशैलीचे अंधानुकरण केले जाऊ लागले. त्याचे पुनर्निर्माण करण्यात येऊ लागले. या दोन्ही कला प्रवाहासोबत जाणारे कलाकार चाचपडत होते ते एखाद्या मार्गदर्शकासाठी. या कठीण प्रसंगात दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरेल असे व्यक्तित्व त्यांना जाणवत नव्हते. या कालावधीत अंधारात चाचपडणाऱ्या नवोदीत कलाकारांच्या पिढीला प्रकाशाचे किरण दाखविण्यासाठी एक भक्कम अश्या मार्ग