पंचाहत्तरी पूर्ण
या मुंबई शहरात कोणीही येतांना त्याला समोर दोन रस्ते दिसतात. एक क्षणीक सुख दाखवणारा मोहाचा आणि दुसरा कठोर परीश्रम करायला लावून आपली परीक्षा घेणारा, तसेच त्याचे फळ भरभरून आपल्या पदरात टाकणारा कर्तव्याचा! प्रत्येकाने आपले ध्येय ठरवावे, आपणास भविष्यात काय हवे त्याचा. बरेच जण स्वीकारतात मोहाचा रस्ता जो पुढे त्यांना आपल्या आयुष्याची तुटकी फाटकी लक्तरं घेऊन हरलेल्या स्थितीत जगापुढं मान तुकवायला लावत असतो. आणि 'कठोर' परिश्रमाला पर्याय नाही' या उक्तीला धरून चालणारा मात्र यशोदेवीची वरमाला गळ्यात घालून मिरवतो. सुदैवाने मला दुसरा मार्ग चोखाळायला मिळाला हे मला माझ्या मुंबईने दिलेले एक सुवर्ण लेणं आहे. गेल्या वर्षी मी माझ्या २९ ऑगस्टला होणाऱ्या आणि ७५ वे वर्ष लागलेल्या जन्म दिवसाला उद्देशून 'अवघे पाऊणशे वयमान' नांवाचा लेख लिहून माझ्या गत आयुष्याचा एक धावता आढावा घेतला होता. माझे गुरुवर्य, सोबती, हितचिंतक या सर्वांच्या आठवणींना उजाळा दिला होता. आणि पहाता पहाता ते संपूर्ण वर्षच असे कांही डोळ्यापुढून सरून गेले कीं ते आले कधी आणि गेले कधी हे देखील समजले नाहीं आणि पाहतो तो